(1) १. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल.
(2) २. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल.
(3) ३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय?
(4) ४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील.
(5) ५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल.
(6) ६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत.
(7) ७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील.
(8) ८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील.